पक्षीय आणि संसदीय राजकारणात नेहमी आपल्या पक्षाशी विसंगती आणि लोकसभेमध्ये अल्प उपस्थिती यामुळेच की काय २०१९ च्या निवडणुकीत राजेंच्या मतांमध्ये घट झाली. आपल्या विशेष शैलीमुळे युवकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या उदयनराजेंनी किंवा या जिल्ह्यावर कायम आपली सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने येथील युवकांसाठी काय प्रयत्न केले, असा प्रश्न जनता विचारताना दिसत आहे.