राहुल गांधी यांच्याकडे युवा नेतृत्व म्हणून बघताना त्यांना मोदींसारख्या जनसामान्यांमध्ये प्रभावी असणाऱ्या नेत्याशी स्पर्धा करावी लागणे, हे त्यांच्यापुढील आव्हान आहे. देशाला आणि महाराष्ट्राला नवा विव्हर देण्यासाठी, युवकांना प्रेरीत करण्यासाठी एक आराखडा किंवा दृष्टिकोन असणे गरजेचे असते. अशावेळी काँग्रेसकडे एक चेहरा आणि दुसरे जिंकण्याची जिद्द नसणे हे या पक्षाच्या अपयशाचे कारण आहे.